२००४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुक ही १३ ऑक्टोबर २००४ रोजी आयोजित करण्यात आलेली निवडणूक होती. याद्वारे महाराष्ट्राची ११वी विधानसभा निवडण्यात आली. निवडणुकीपूर्वी राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकशाही आघाडी सरकार होते. मुख्य लढत प्रमुख आघाडी म्हणजे लोकशाही आघाडी आणि भारतीय जनता पार्टी - शिवसेना यांची युती ह्यांच्या मध्ये होती. इतर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि लोकजनशक्ती पक्ष ह्यांचा समावेश होता. ह्या निवडणुकीत आघाडी सरकारने चुरशीच्या लढतीत युतीचा पराभव करून आपली सत्ता कायम ठेवली. विलासराव देशमुख आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले. ही मुख्यमंत्री म्हणून त्यांची दुसरी आणि अखेरची कारकीर्द ठरली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४
यामागील विज्ञान आणि इतिहास.