२८ मे ते १३ जून २०१० दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला.
उभय संघांदरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय टी२० मालिका भारतीय संघाने २-० अशी जिंकली.
त्याआधी मायक्रोमॅक्स चषकासाठी त्रिकोणी मालिकेमध्ये भारत, झिम्बाब्वे आणि श्रीलंका हे संघ सहभागी झाले होते. सदर मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेचा ९ गडी राखून पराभव केला. केवळ एका विजयाची नोंद करता आल्याने, भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१०
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?