भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९४७-फेब्रुवारी १९४८ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. स्वतंत्र भारताचा हा पहिला विदेशी दौरा होता. तसेच ऑस्ट्रेलियाचा भारताने प्रथमच दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी लाला अमरनाथ यांच्याकडे होते. ५ सामन्यांच्या मालिकेत १ सामना अनिर्णित राहत ऑस्ट्रेलियाने ४ सामने जिंकत मालिका विजय मिळवला. कसोटी सामन्यांबरोबरच भारताने १४ प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९४७-४८
यामागील विज्ञान आणि इतिहास.