भारत क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व इफ्तिखार अली खान पटौडी यांनी केले. भारताच्या फाळणीआधीचा हा शेवटचा भारतीय संघाचा दौरा होता. या दौऱ्यात भारताकडून खेळल्यानंतर काही खेळाडू नंतर पाकिस्तानतर्फेही खेळले.
दौऱ्यात ३ कसोटींसह एकूण २९ प्रथम-श्रेणी सामने खेळवले गेले. कसोटी मालिकेत भारताला १-० अश्या पराभवाला सामोरे जावे लागले.
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४६
या विषयातील रहस्ये उलगडा.