बाळासाहेब सावंत

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

परशुराम कृष्णाजी उपाख्य बाळासाहेब सावंत हे २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते ५ डिसेंबर, इ.स. १९६३ या कालावधीत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे बाळासाहेब सावंत यांच्याकडे आली होती. त्यांनी केवळ तेरा दिवस राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.

इ.स. १९५२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वेंगुर्ले मतदारसंघातून त्यांची विधानसभेवर निवड झाली होती. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला होता.

मराठी चित्रपटांत आणि नाटकांत कामे करणाऱ्या अभिनेत्री वनमाला या पी.के. सावंत यांच्या पत्नी होत्या.

ई.स. २००१ मध्ये त्यांच्या स्मृतीचा आदर म्हणून कोकण कृषी विद्यापीठाला डॉ. बाळासाहेब सावंत यांचे नांव जोडून नामविस्तार केला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →