बहे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे.
हे गाव वाळवे तालुक्यात कृष्णेच्या तीरावर बोरगावजवळच आहे. आणि म्हणूनच या गावाचा उल्लेख बहे-बोरगाव असा केला जातो. “कृष्णा माहात्म्यात“ या गावाचा उल्लेख बाहुक्षेत्र असा केला आहे. येथे कृष्णा नदीचा प्रवाह दोन धारांत विभागून वाहत असून मध्यभागी एक लहानसे बेट तयार झालेले आहे. या बेटावर समर्थ रामदास स्वामींनी मारुतीची स्थापना केली आहे. हा मारुती समर्थांच्या अकरा मारुतीपैकी एक आहे.तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारी क्रांतिकारी नायक ,क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव म्हणून ओळख आहे. त्यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ होते आणि ते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते जे 1929 ते 1932 दरम्यान भूमिगत झाले होते.
बहे (वाळवा)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.