पारशी हा एक संप्रदाय आहे. पारशी लोक दहाव्या शतकात पर्शियामधील इस्लामी राज्यवटीकडून सुरू असलेल्या छळापासून सुटका करण्यासाठी स्थानांतर करून भारतात (मुख्यतः गुजरातमध्ये) स्थायिक झाले.
भारताच्या इतिहासात अनेक पारशी लोकांना विशेष स्थान आहे. व्यापार ही पारशी लोकांची अंगभूत कला असल्यामुळे आजवर भारतात अनेक यशस्वी पारशी उद्योगपती होऊन गेले. भारतीय जनगणनेनुसार पारशी लोकांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. सध्या जगात केवळ १ लाख पारशी अस्तित्वात आहेत.
महात्मा गांधी पारशी लोकांविषयी म्हणाले होते की, हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% आहे पण, त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. स्वातंत्र सैनिकांपासून ते उद्योजकांपर्यंत पारश्यांचेही येगदान आहे.
पारशी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.