द.पं. जोशी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

द.पं. जोशी (जन्म : परभणी जिल्हा, १४ ऑक्टोबर, इ.स. १९३२; - हैदराबाद, ३० डिसेंबर, इ.स. २०११) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार होते.

द. पं. जोशी हे हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेचे ३० वर्षे कार्यवाह होते. त्यांनी ८ वर्षे परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळले. परिषदेच्या ‘पंचधारा’ या त्रैमासिकाचे संपादन करून ते मराठी महाविद्यालयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत.

परभणी येथील नूतन विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करून जोशी उच्च शिक्षणासाठी हैदराबादला आहे. उस्मानिया विद्यापीठीतून ते इ.स. १९५९ साली एम.ए. झाले. मुळात अंगी इतिहासाबद्दलचे प्रेम, पूर्वसूरींबद्दल आदर, कामाची आवड, अभ्यासू वृत्ती आणि कुशाग्र बुद्धी असल्याने जोशी हैदराबादला आले आणि त्यांनी वेगवेगळ्या सार्वजनिक कामांत गुंतत गेले. बाल हनुमान संघ, साधना संघ, मराठी महाविद्यालय आणि मराठी साहित्य परिषद ही त्यांची मुख्य कार्यक्षेत्र राहिले आहे. १९५८पासूनच ते ’पंचधारा’ त्रैमासिकाशी जोडले गेले. श्रीधरराव कुलकर्णी, रा.ब. माधेकर या मंडळींनी अधिक सामाजिक आणि साहित्यिक कामासाठी संपादकपद सोडल्यानंतर द.पं. जोशी यांनी इ.स. १९७४ सालापासून ’पंचधारा’च्‍या संपादकत्वाची धुरा खांद्यावर घेतली होती.

उस्मानिया विद्यापीठातील पुरतत्त्व विभागातल्या प्राचीन हस्तलिखितांच्या पोथ्या आणि परिषदेतील हस्तलिखिते यांची सूची करून ती द.पं.जोश्यांनी ती महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेल्या ’हैदराबादेतील मराठी हस्तलिखिते’ या ग्रंथात सम्मीलित करण्यासाठी दिली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →