तितली चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले एक चक्रीवादळ आहे.ते ओडिशा व आंध्र प्रदेश या भारताच्या किनारपट्टीवर दि. ११-१०-२०१८ रोजी धडकेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.ते सन २०१८ च्या आजवरच्या इतिहासातील सर्वात तीव्र चक्रीवदळ आहे.या वादळाचा प्रभाव ओडिशाच्या गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा व जगतसिंगपूर या जिल्ह्यांंवर पडला.
या वादळामुळे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम व विजयनगर जिल्ह्यात आठ लोक ठार झाले आहेत व ओडिशात एक व्यक्ती ठार झाली आहे.वादळामुळे ओडिशात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने सरकत आहे. वादळामुळे खूपशी वित्तहानीही झाली आहे.
तितली चक्रीवादळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.