भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना राष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हणले जाते. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम भारत सरकारचे पुरातत्त्व खाते करते. भारत सरकारने घोषित केलेल्या अशा संरक्षित स्मारकांना हानी होऊ नये यासाठी इ.स. १९५१ साली ऐतिहासिक वास्तू व स्मारके जतन कायदा करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यामार्फतही अशाच महाराष्ट्र राज्यातील काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके म्हणले जाते. या राज्य संरक्षित स्मारकांच्या देखभालीचे आणि संरक्षणाचे काम महाराष्ट्र शासनाचे पुरातत्त्व खाते करते.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.