जनसाहित्य संमेलन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जनसाहित्य संमेलने अनेक संस्था भरवतात. त्यांतली काही संमेलने --



१ले : विदर्भ जनसाहित्य संमेलन, ३१-३-१९८५

३रे : विदर्भ जनसाहित्य संमेलन, नरखेड (नागपूर जिल्हा); १०-१०-१९९८; संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप

४थे अखिल भारतीय मराठी जनसाहित्य संमेलन, १९९०; भंडारा, अध्यक्ष - आनंद यादव

४थे जनसाहित्य संमेलन : लाखनी (भंडारा), संयोजक प्रा.द.सा. बोरकर

७वे मराठी जनसाहित्य संमेलन, वरूड येथे २००२ मध्ये. अध्यक्ष - तुळशीराम काजे

१०वे जनसाहित्य संमेलन, मोझरी. २००५; संमेलनाध्यक्ष - प्रा.डाॅ. रवींद्र ठाकूर

जनसाहित्य संमेलन : यावली शहीद (जिल्हा अमरावती),२६-४-२००९,संमेलनाध्यक्ष प्राचार्य वेरुळकर

जनसाहित्य संमेलन : अमरावती, संमेलनाध्यक्ष डॉ. भा.ल. भोळे

जनसाहित्य संमेलन : धनवटे नॅशनल काॅलेज (नागपूर), संमेलनाध्यक्षा - अमृता प्रीतम

अखिल भारतीय जनसाहित्य परिषदेतर्फे भरलेले १ले राष्ट्रसंतप्रणीत जनसाहित्य संमेलन : गुरुकुंज मोझरी (जिल्हा अमरावती), ७-१०-२००९, संमेलनाध्यक्ष डॉ.किसन पाटील. (डॉ.सुभाष सावरकर हे मराठी जनसाहित्य परिषदेचे,२०१२ साली असलेले कार्याध्यक्ष आहेत; सरचिटणीस डॉ. नीळकंठ मेंढे आहेत. ही प्रकाशनसंस्था पुस्तके प्रकाशित करते) (जनसाहित्य साधना नावाची एक वेगळीच प्रकाशन संस्था अक्षरवैदर्भी नावाचा दिवाळी अंक प्रसिद्ध करते.)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →