'खेडयाकडे चला' ही ग्रामीण लोक जीवनाशी निगडित असलेली एक अभिनव चळवळ आहे. ही चळवळ इ. स. १९१६ मध्ये सुरुवात झाली असून राष्ट्रपिता महात्मा गांधी या संंकल्पनेचे प्रणेते मानले जातात.
खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी ‘खेड्याकडे चला' अशी हाक दिली. ज्यात गावखेडयाचे सक्षमीकरण हा महत्त्वपूर्ण हेतू होता. आजही या अभिनव मोहिमेची उपयुक्तता जाणवत असून शहरातील वाढता रोजगाराचा प्रश्न, वाढती गर्दी आणि ओस पडलेले खेडे यामुळे गांधीजींचा हा मूलमंत्र आर्थिक समस्येचे निराकरण करण्याचा आणि आत्मनिर्भर भारताचा मार्ग सुचवतो. कृषी ग्रामीण क्षेत्रातील उत्पादकता, गुंतवणूक, रोजगारनिर्मितीचे महत्त्व आदी बाबी यातून स्पष्ट होते. प्रत्येक गावखेडी स्वयंपूर्ण व्हावे. ग्रामीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावे. असे महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजना मध्ये गांधीजींच्या 'खेडयाकडे चला' या मुलमंत्राचा दखल घेऊन गावखेडयाच्या विकासासाठी योजना आखली गेली.या मुलमंत्रामुळे गावखेडी प्रकर्षाने अधोरेखित होऊन प्रगतीचे मार्ग तयार झाले. गावखेडीच्या संदर्भाने पुढे शासकीय स्तरावर विविध योजना राबविण्यात आल्या. परंतु या संकल्पना आणि , मोहीमेपासून दुर्गम भागात निसर्ग सान्निध्यात वसलेेल्या तांडा, वाडीवस्ती मात्र पुुर्णपणे वंचित रााहिली. परिणामी गावाच्या तुलनेत तांडा, वाडीवस्त्त्या विकासापासून मागे पडत गेले. स्वातंत्र्याच्या पन्नाशीनंतरही तांडा, वाडी-वस्त्या मुख्य प्रवाहापासून वंचित असल्याने सन २०१६ मध्ये तांडयाच्या सक्षमीकरणासाठी 'तांडेसामू चालो' हा तांडावादी विचार सर्जनशील विचारवंत एकनाथराव नायक यांनी प्रथमच रुजवले. 'तांडेसामू चालो' अशी हाक देत त्यांनी तांडा सक्षमीकरणावर भर दिला. त्याचे सकारात्मक बदलही पहायला मिळाले. मात्र १९१६ ते २०१६ असा तब्बल शंभर वर्षांचा कालावधी या संकल्पनेत दिसून येतो. निश्चितच तांडा आणि प्रस्थापित गावखेडे हे विकासाच्या व आधुनिकतेच्या बाबतीत दोहोंत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट होते. तांडा सुद्धा ग्रामीण विस्थापित जीवनाचा एक अविभाज्य घटक असल्याने तांडा,वाडी आणि गाव खेडे हे स्वतंत्र अभ्यासाचे विषय मानले जाते. त्यामुळे 'खेडयाकडे चला' या संकल्पनेबरोबरच 'तांडेसामू चालो' या संकल्पनेचाही अभ्यास होणे महत्वपूर्ण मानले जाते. तांडे अजूनही दूर्लक्षितच राहिलेले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज्याची संकल्पना मांडली. त्यातून ग्रामीण विकास अधोरेखित केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे. सर्वामध्ये सलोखा निर्माण व्हावा. खेडयांची रचना व्यवस्थाबद्ध व्हावी असे ग्रामवादी विचार 'खेड्याकडे चला' या संकल्पनेतून मांडले गेले.
खेड्याकडे चला
यामागील विज्ञान आणि इतिहास.