वसंतराव नाईक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

वसंतराव नाईक

वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी झाला. वसंतराव नाईक हरितक्रांती , पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या. महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच जाणीव नव्हती तर, दूरगामी स्वरुपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. कृषीसंस्कृतीचा पुनर्रूत्थान करीत वसंतराव नाईकांनी देशभरात नावलौकिक मिळविला. आधुनिक भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचा त्यांनी मान उंचाविला. प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत एकनाथराव पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. तसेच 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणूनही त्यांना संबोधतात. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. महानायक वसंतराव नाईक हे एक नाव नसून शाश्वत विकासाची लोकाभिमुख विचारधारा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →