१९८३ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव १९८३ प्रुडेंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे हे तिसरे आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये ९ ते २५ जून १९८३ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज श्रीलंका व झिम्बाब्वे या ८ संघांनी सहभाग घेतला. गट फेरीचे सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ उपांत्य फेरीत गेले. या आधीची स्पर्धा इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी १९७९ साली झाली. मागील विजेते वेस्ट इंडीज संघ होता.
सर्व सामने ६० षटकांचे होते व सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले.
इंग्लंड, पाकिस्तान, भारत व वेस्ट इंडीज संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. २५ जून १९८३ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघाला ४१ धावांनी हरवत विश्वचषक पटकावला.
क्रिकेट विश्वचषक, १९८३
यामागील विज्ञान आणि इतिहास.