कलावती देवी (जन्म c. १९६५) ह्या एक भारतीय महिला गवंडी आहेत. यांनी कानपूरमध्ये शौचालय बांधणीचा आगळावेगळा ध्यास घेतला. कलावतीने एक ५० आसनांचे शौचालय बसवून स्वतःच्या समुदायात परिवर्तन घडवून आणले, ज्याचा नंतर इतर समुदायांमध्ये देखील फायदा झाला. पुढे कलावती यांनी विशेषतः महिला आणि मुलांसाठी ४,००० शौचालये बांधण्यास मदत केली आहे. या कामासाठी २०१९ मध्ये कलावती देवी यांना नारी शक्ती पुरस्कार; भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कलावती देवी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.