सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७, मध्ये पाच एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सप्टेंबर २०१७ मध्ये सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या. एकदिवसीय मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरूद्ध ५० षटकांचा सामना खेळताना १०३ धावांनी विजय मिळवला. भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकूलन आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा पहिले स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळण्याच्या नवीन अटींनुसार, पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) या मालिकेत पहिल्यांदाच टी२० सामन्यात वापरण्यात आली. तिसरा सामना ओल्या मैदानामुळे होऊ न शकल्याने, टी२० मालिका १–१ अशी अनिर्णित राहिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.