अशोक चिटणीस हे ललितलेखन करणारे एक मराठी कथालेखक आणि चरित्रकार आहेत. ते ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक होते. एम.ए.च्या वर्गात शिकत असताना अशोक चिटणीसांनी त्यांनी लिहिलेली ‘पखांमधले गीत संपले’ ही पहिली कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशनच्या कांदंबरी लेखन स्पर्धेसाठी पाठवली होती. त्यावेळी या स्पर्धेत अण्णा भाऊ साठे, मधु मंगेश कर्णिक, माधव कानिटकर, श्री.ज. जोशी, श्रीपाद काळे इत्यादी दिग्गज लेखक-मंडळी होती. दोनशे कांदंबऱ्यामधून ‘पखांमधले गीत संपले’ ही कादंबरी दुसरी आली. जयवंत दळवी यांच्या चक्र कादंबरीला पहिला क्रमांक मिळाला.
त्यांच्या साप आणि शिडी या कथेला १९७२ साली आचार्य अत्रे कथालेखन स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले होते. ‘नवयुग’मधून ही कथा प्रसिद्ध झाली होती. १५०० कथांमधून हिची निवड झाली होती.
अशोक चिटणीस यांची २७हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काही पुस्तकांच्या एकाहून अधिक आवृत्या निघाल्या आहेत. त्यांनी त्यांचे ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे पुस्तक केवळ सतरा दिवसांत आणि स्वरांकित हे पुस्तक फक्त सहा दिवसांत लिहून पूर्ण केले.
अशोक चिटणीस यांचे कथाकथनाचे ५६०हून अधिक कार्यक्रम झाले आहेत.
अशोक चिटणीस
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.