२ जून, २०२३ रोजी ओडिशाच्या बालासोर शहराजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाली. एक मालगाडी तसेच कोरोमंडल एक्सप्रेस आणि हावडा-यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस बहानागा बाजार रेल्वेस्थानकाजवळ आदळल्या. या अपघातात २९४ व्यक्ती मृत्यू पावल्या. ४ जून रोजी बचावकार्य अजून सुरू असताना हा आकडा ३८० पर्यंत जाण्याची शक्यता होती. यांशिवाय १,१७५ पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्याचा अंदाज आहे.
भारतीय रेल्वेवरील सगळ्यात भीषण अपघातांपैकी हा एक आहे.
२०२३ ओडिशा रेल्वे अपघात
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.