एर इंडिया फ्लाइट १७१

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एर इंडिया फ्लाइट १७१

एर इंडिया फ्लाइट १७१ ही भारतातील अहमदाबाद विमानतळावरून युनायटेड किंग्डममधील लंडन गॅटविक विमानतळावर जाणारे एक नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाण होते. १२ जून २०२५ रोजी विमानतळावरून हवेत झेप घेतल्यावर लगेचच अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरात हे विमान कोसळले. त्यातील सर्व २४२ लोक ठार झाले. या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानात २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. यांशिवाय जमिनीवरीलही डझनावारी लोक ठार झाल्याचा अंदाज आहे.

बोईंग ७८७ विमानप्रकाराचा पहिलाच जीवघेणा अपघात आहे. पूर्ण विमान नष्ट झाल्याचाही पहिलाच किस्सा आहे मलेशिया एरलाइन्स फ्लाइट १७ नंतरचा दुहेरी रांगा असलेल्या विमानात प्रवाशांचा मृत्यू झालेला हा पहिलाच विमान अपघात होता. १९८५ मध्ये एर इंडिया फ्लाइट १८२ वर बॉम्बस्फोट झाल्यानंतर एर इंडियाने विमान गमावल्याचाही हा पहिलाच किस्सा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →