१९९१-९२ शारजाह चषक (किंवा प्रायोजक नावाने १९९१-९२ विल्स चषक) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १७-२५ ऑक्टोबर १९९१ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत पाकिस्तान, भारत आणि इंडीज या तीन देशांनी भाग घेतला.
स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी दोन सामने खेळले. भारताने तीन आणि पाकिस्तानने दोन सामने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. वेस्ट इंडीज गट फेरीमधूनच स्पर्धेतून बाद झाला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला ६२ धावांनी पराभूत करत चषक जिंकला. भारताच्या संजय मांजरेकरला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
१९९१-९२ शारजा चषक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.