हरेंद्र जाधव

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

लोककवी हरेन्द्र हिरामण जाधव

दहा हजाराहून अधिक काव्यांचा हा निर्माता ज्याने आयुष्यातील ६० वर्षाहुन अधिकचा काळ हा कलेच्य माध्यमातून समाजप्रबोधनासाठी खर्च केला आहे. जनसामान्याचा मनातील भाव, त्यांच्या व्यथा अचूक ओळखून त्यांनी आपल्या गीतांची रचना केल्यामुळे ते महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील समाजबांधवान पर्यंत समजप्रबोधनात्मक विचार पोहोचविण्यात यशस्वी झाले. फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारांची मशाल त्यानी नेहमीच आपल्या लिखाणामधून धगधगत ठेवली. आणि म्हणूनच आजही "पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा", " हे खरंच आहे खर श्री भिमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर" तसेच "हे जयंती दिना ही तुला प्रार्थना होऊ हे या दिनी भीम जन्म पुन्हा". ही गीते ऐकताना शरीरात आजही एक वेगळीच उर्जा निर्माण होते. आंबेडकरी चळवळीत अनेक गुणी लोककलाकार निर्माण झाले त्यापैकीच एक कवी म्हणजे आयु. लोककवी हरेन्द्र हिरामण जाधव.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →