हरि सखाराम गोखले ( - १६ मार्च, १९६२) हे एक मराठी कवी आणि पुस्तक प्रकाशक होते. त्यांच्या अनेक कविता शालेय पाठ्यपुस्तकांत असत. ह.स. गोखले यांनी लिहिलेल्या शुद्धलेखनावरील पुस्तकामुळे ते 'शुद्धलेखन - शुद्ध मुद्रण कोश'कर्ते हरी सखाराम गोखले या नावाने ओळखले जात. ’कांहींतरी’ हा ह.स. गोखले यांच्या कवितांचा संग्रह व्हीनस प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे..
कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेल्या ’दोष कोणाचा?’ या पुस्तकाचे ते प्रकाशक होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद उत्कृष्ट काव्यसंग्रहाच्या कवीला ह.स. गोखले पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :
आसावरी काकडे (आरसा या पुस्तकासाठी)
नीरजा (नीरन्वय या काव्यसंग्रहासाठी)
हरी सखाराम गोखले
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.