सुरेंद्र रावसाहेब पाटील (२१ डिसेंबर, १९६३ - लामजना, औसा तालुका, लातूर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे मराठी कादंबरीकार आहेत. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी ए.टी.डी., जी.डी.आर्ट (पेंटिंग), ए.एम.-लातूर, मुंबई - सांगली येथे कलाशिक्षण घेतले आहे.
१९९३ च्या भूकंपाचा लामजना गावाला बसलेल्या मोठ्या फटक्याचे पडसाद पाटील यांच्या आरंभीच्या कथासाहित्यातुन दिसतात.
पाटील हे १९९० पासून मा.दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी येथे 'रेखाकला व रंगकाम' विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
यांनी रेखाटनकार, चित्रकार आणि लेखक म्हणुन स्वतःची ओळख निर्माण केली आहे. १९८८ मध्ये सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयात 'कोरडी पॅलेट' या एकांकीकेपासून लेखनाची सुरुवात. १९९३ च्या विनाशकारी भूकंपाचा परिणाम लेखनावर झाला. महाविद्यालयात कवी फ.म. शहाजिंदे यांच्या सान्निध्यात लेखनाची आवड गंभीरतेत बदलली. १९९३चा भूकंप, नापिकी, सततचा दुष्काळ हे लेखनातुन मांडले. राजन गवस, भास्कर चंदनशीव यासारख्या लेखकांचे साहित्य तसेच निवडक प्रादेशिक साहित्य वाचनाने लेखन बदलत गेले. गावमातीतला उघडा माणूस साहित्यात मांडला. लामजना व औराद शहाजानी परिसरातील बोली, शेतकरी जीवन, सुशिक्षित तरुणाचे भंगलेपण मांडायचा प्रयत्न पाटील यांच्या लेखणीने केला. अक्षरलिपी, वाघूर, मुराळी, सामना, प्रतिभा, सकाळ,पुण्यनगरी आदी अनेक दिवाळी अंकातून कथा, व्यक्तिचित्रे प्रकाशित.
सुरेंद्र पाटील
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.