स्वामी सहजानंद सरस्वती (१८८९ - १९५०) हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकरी नेते होते. हे दशनामी आखाड्याचे संन्यासी असून संस्कृत पंडित आणि लेखक होते. त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केले. हे भाष्य मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. त्यांनी गीता आणि मार्क्सवाद यांचा तुलनात्मक अभ्यास करणारा एक ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्यावर शंकराचार्यांपासून मार्क्सपर्यंतचा प्रभाव होता. गीतेतच खरा मार्क्सवाद आणि साम्यवाद सापडतो अशी त्यांची भूमिका दिसते. ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कॉ. नंबुद्रीपाद यांचा आदर करीत. त्यांनी पूर्व-मीमांसा, वेदान्त, भागवत, शंकराचार्य, मार्क्सवाद, गांधीवाद आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, इ. क्षेत्रांत काम केले. भाष्यग्रंथांच्या आधारे नव्हे तर जीवनानुभवाच्या आधारे गीता समजते हे त्यांचे मुख्य प्रतिपादन आहे.
त्यांनी अखिल भारतीय किसान सभा या संघटनेच्या स्थापनेचे काम केले.
सहजानंद सरस्वती
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.