राग यमन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

राग यमन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

या रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मानला जातो. कल्याण रागांची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात.

स्वर - सा रे ग म प ध नि

आरोह -नी रे ग म धनी सां

अवरोह - सांनी ध प म ग रे सा

म - तीव्र मध्यम.

ह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहामध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थाने (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या गायनामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते.

रागात नेहमी ऐकू येणाऱ्या स्वरावली खालीलप्रमाणे.

नि रे ग,नी रे ग म प ->(मग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे धनी ध प, प म (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याणचे एक वैशिष्ट्य आहे.

यमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. या रागावर आधारित असंख्य चित्रपटगीते तसेच भावगीते आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →