संजय पवार

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

संजय पवार हे चित्रकार, जाहिरातकार आणि मराठी नाटककार, स्तंभलेखक, संवाद लेखक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी ’सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटासाठी दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी जब्बार पटेलांच्या ‘मुक्ता’ या सिनेमासाठी संवाद लेखन केले. त्यानंतर डोंबिवली फास्ट (संवाद), सातच्या आत घरात (संवाद), सनई चौघडे (संवाद), मी सिंधूताई सपकाळ (पटकथा संवाद), मी शिवाजी राजे भोसले बोलतोय.. (पटकथा संवाद) आणि ‘लई भारी’ या चित्रपटाचे संवाद लेखनही पवार यांनी केले आहे. त्यांनी लिहिलेल्या ’कोण म्हणतो टक्का दिला’, ’गाईच्या शापाने’ आणि ’१९७४ आणि एके ४७’ या एकांकिकांनी रंगभूमीवर वादळ उठवले होते.

संजय पवार यांनी हिंदीतही त्यांनी ज्युली, बिरूद या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे.

संजय पवार यांना २०१२ सालचा दया पवार स्मृति पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ’सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटासाठी दोन पुरस्कार मिळाले आहेत. संजय पवार यांना ’ठष्ट’ या नाटकाच्या लेखनासाठी मॅजेस्टिक प्रकाशनाचा विसाव्या वर्षीचा जयवंत दळवी पुरस्कार देण्यात आला. (२४-९-२०१५)

संजय पवार हे तिसऱ्या सम्यक साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते.

कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २७ ते ३० डिसेंबर २०१२ या काळात नाटककार संजय पवार यांच्या एकांकिकांचा महोत्सव भरवला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →