रेखा बैजल या मराठवाड्यातल्या जालना या गावी राहणाऱ्या मराठी लेखिका आहेत. त्यांचे माहेरचे नाव रेखा सप्रे. मराठवाड्यातल्या लहान खेड्यांतून नववीपर्यंत शिकत रेखा सप्रे यांनी सोलापूर, जालना, नगर या तीन शहरांतून शिक्षण केले आणि त्या बी.ए. झाल्या. बी.ए.च्या दुसऱ्या वर्गात असल्यापासून त्या मराठीत कथा, निबंध वगैरे लेखन करीत असत.
रेख सप्रे यांचे लग्न शिवकुमार बैजल यांच्याशी झाले. त्या पंजाबी घरात घरकामे करता करता त्यांनी एक्स्टर्नली एम.ए. केले. लहान मुले, त्यांच्या शाळा, अभ्यास घेणे, स्वयंपाक करणे वगैरे गृहिणीची कामे करता करता त्यांचे लिखाण सुरूच राहिले.
अशा प्रयत्नांतून रेखा बैजल यांचा ’मानस’ हा कथासंग्रह निघाला. त्याला ज्योत्स्ना देवधरांची प्रस्तावना होती. त्यांनी नंतर ’आकाशओढ’ हे नाटक लिहिले. या नाटकाचे काही प्रयोग राज्य नाट्यस्पर्धेत झाले. दोन्ही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले. रेखा बैजल यांची पुढची ‘देवव्रत‘ ही कादंबरी एका निसर्गधर्माविरुद्ध जाऊ पाहणाऱ्या तरुणीची शोकांतिका होती.
रेखा बैजल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.