अनुराधा शशिकांत वैद्य (जन्म : इ.स. १९५५; - २४ ऑगस्ट, इ.स.२०१६) या एक मराठी लेखिका होत्या.
त्यांचे आई-वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात हिरीरीने काम केले होते. घरात एकूण ७ भावंडे, म्हणजे २ भाऊ आणि ५ बहिणी होत्या. शिक्षण संपल्यासंपल्या अनुराधा यांचे लग्न डॉ. गणपतराव वैद्य आणि इंदिराबाई वैद्य यांचा मुलगा शशिकांत वैद्य यांच्याशी झाले आणि मग त्या लग्न, संसार, शेती-भाती, गुरे-ढोरे, प्राणी आणि शिवणकला, पाककला, गायन इत्यादींत रमल्या. शाळा-कॉलेजात खरे तर लेखनाची सुरुवात होते, पण अनुराधा वैद्यांची लिखाणाची सुरुवात वयाच्या ३५व्या वर्षी झाली. सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद, जळगाव, पुणे आकाशवाणीसाठी लेखन करायला सुरुवात केली.
जयपुर-अत्रौली घराण्याच्या गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी यांच्या त्या मावशी लागतात.
वैद्य कुटुंबाचा औरंगाबादच्या खडकेश्वर भागात एक एकरात बंगला होता. तिथे बंगल्यात वैद्यमंडळी हौसेने शेती करत असत. मग त्यांनी बाग तयार केली. त्या दरम्यान शेळी, कुत्री, मांजरी असे विविध प्रकारचे प्राणी पाळले. या सर्व प्राण्यांचे करताना अनुराधा वैद्यांना लिहायला, वाचायला वेळ मिळत नव्हता. पण त्याचवेळी त्यांनी अमरेंद्र मासिकासाठी `वनवास हा सुखाचा’ ही कथा लिहिली. त्यांच्या प्राणी पाळण्यावरच ती कथा बेतलेली होती. ती कथा छापून आल्यावर लोकांना ती कथा आवडली, आणि त्या कथेला मिळालेला प्रतिसाद पाहूनच मग अनुराधा वैद्यांच्या लेखनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
अनुराधा वैद्य
या विषयावर तज्ञ बना.