येरवडा मध्यवर्ती तुरुंग हा महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेला महासुरक्षित तुरुंग आहे. हा तुरुंग महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तुरुंग आहे, तर दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. यात अंदाजे ३,६०० कैदी बंदिस्त राहू शकतात.
या तुरुंगात महात्मा गांधींपासून अजमल कसाबपर्यंत अनेक व्यक्ती येथे बंदिवासात होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यसैनिकही ह्या तुरुंगात बंदिवासात होते.
येरवडा मध्यवर्ती कारागृह
थोडक्यात पण महत्त्वाचे.