दुसऱ्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये १९६७ साली तिसऱ्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. या निवणुकी आधी मतदार संघांची पुनर्रचना करून एकूण जागा २६४ वरून २७० करण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सर्वाधिक २०३ जागा जिंकल्या तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे फक्त १९ उमेदवार निवडून आले. विद्यमान मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवड झाली तर बाळासाहेब भारदे यांची पुन्हा विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७
या विषयावर तज्ञ बना.