महाड हे महाराष्ट्रात कोकण विभागातील एक शहर आहे. महाड हे मुंबईपासून १८० किलोमीटर अंतरावर, तर पुणे शहरापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे चवदार तळे सत्याग्रह केला आणि हे ठिकाण इतिहासात अमर झाले. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे.
महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले शहर आहे. कोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे बऱ्यापैकी सुधारलेले शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा-वेगळा संगम आहे.
महाड
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!