मधुसूदन विष्णू कौंडिण्य उर्फ मामा कौंडिण्य (मार्च १७, १९३३ - जानेवारी २८, २०१३) ह्यांचा जन्म नशिराबाद, जळगाव (खानदेश) येथे झाला होता. अर्थशास्त्रात एम.ए. झाल्यावर ते १९५८मध्ये अहमदनगर महाविद्यालयात लेक्चरर म्हणून रुजू झाले. साने गुरुजींचा त्यांना प्रत्यक्ष सहवास व प्रेम लाभला होता आणि त्यामुळे ते आयुष्यभर मुलांच्या शिक्षणासाठी झटले.
म.वि. कौंडिण्यांच्याच पुढाकाराने संगमनेर महाविद्यालयाची १९६१ साली स्थापना झाल्यावर ते त्या कॉलेजचे प्राचार्य झाले, आणि सलग ३२ वर्षांनंतर १९९३साली निवृत्त झाले. या काळात त्यांनी अनेक शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम राबवले. वंचितांच्या शिक्षणासाठी आणि समाजोन्नतीसाठी त्यांनी विविध असे १५ प्रकल्प राबविले.
१९९९साली पुण्यात आल्यावर, पुण्याजवळील सूस व आसपासच्या दोन गावांमध्ये कौंडिण्य यांनी समाजकार्य सुरू केले. कचरा गोळा करणाऱ्या महिलांना संघटित करून त्यांनी सरकारकडून त्यांना जागा मिळवून दिली, त्या जागेवर घरकुले उभे करून त्यांना हक्काची घरे दिली व त्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा काढली.
१९९३ साली कौंडिण्य यांना, त्यांच्या शिक्षणविषयक योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
मधुसूदन विष्णू कौंडिण्य
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?