भारतीय चलचित्रपटह्यात प्रामुख्याने भारतभर पसरलेल्या विविध भाषांतील चित्रपटांचा समावेश होतो. भारतीय चित्रपटांत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ,पंजाब आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यातील चित्रपट संस्कृतीचा आंतर्भाव होतो.मुंबई हे भारतातील सर्वात मोठे चित्रपट निर्मिती केंद्र म्हणुन विकसीत होत आहे,ते मुख्यत्वे करून हिंदी भाषा व मराठी भाषेतील चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.भारतीय चित्रपटांची मागणी दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांत अधिक प्रमाणात आहे.एक प्रसिद्ध माध्यम असल्याकारणाने भारतात सर्वसाधारणपणे सर्व भाषांतील मिळून १०००हून अधिक चित्रपटांची निर्मिती होत असते.परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये विशेषतः इंग्लंड आणि अमेरीकेतील प्रेक्षकांमध्ये
हिंदी भाषा, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि बंगाली भाषेतील चित्रपटांची रेलचेल असते.
भारतीय चलचित्रपट
या विषयातील रहस्ये उलगडा.