भद्रकाली ही कै मच्छिंद्र कांबळी यांनी स्थापन केलेली नाटक कंपनी आहे. १९८० च्या फेब्रुवारी महिन्यात गंगाराम गवाणकरांचे ‘वस्त्रहरण’ रंगभूमीवर आले. ‘ओम् नाटय़गंधा’ने या नाटकाची निर्मिती केली होती. सुरुवातीला आस्तेकदम चालणारे हे नाटक नंतर तुफान धावू लागले. मच्छिंद्र कांबळी यांनी या नाटकात मॅनेजर आणि त्यात्या सरपंच या दोन्ही भूमिका केल्या होत्या. त्यांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. पण ८०० प्रयोगांनंतर काहीतरी बिनसले आणि मच्छिंद्र यांना नाटकातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांची भूमिका रमेश पवार यांनी दिली गेली.
त्यामुळे काहीसे दुखावले गेलेले मच्छिंद्र कांबळी यांनी, मोहन गोखले यांच्या सल्ल्यानुसार स्वतःची नाटक कंपनी काढण्याचा विचार केला. २९ मे १९८२ मध्ये त्यांनी आपल्या मालकीच्या नाट्यसंस्थेची स्थापना केली. या नाट्यसंस्थेसाठी त्यांनी आपली देवीचे भद्रकाली हे नाव आणि साईनाथ अशी दोन नावे निवडली होती. आपले चिरंजीव प्रसाद कांबळी यांना त्यांनी दोन नावांतून एका नावाची चिठ्ठी काढायला सांगितली. त्यात भद्रकालीचे नाव आल्याने संस्थेला ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ असे नाव ठरले.
मच्छिंद्र यांनी नुसतीच नाट्यसंस्था काढली नाही तर ती धडाक्यात चालवलीही. संस्था स्थापन झाल्यावर दोनच महिन्यांनी ‘चाकरमानी’ हे नाटक आणले. त्यानंतर ‘घास रे रामा’, वगैरे. तीस वर्षात भद्रकाली’च्या नावावर ४१ नाटके आहेत. त्यातील ३८ नाटके मच्छिंद्र यांनी केली आणि त्यांतल्यापंचवीस नाटकात त्यांनी भूमिकाही केल्य़ा. या सर्व नाटकांचे मिळून साडेचौदा हजारहून अधिक प्रयोगझाले आहेत. त्यात एकटय़ा ‘वस्त्रहरण’चेच पाच हजारहून अधिक प्रयोग झाले. आठशे-हजार प्रयोगांचा टप्पा तर अनेक नाटकांनी पार केला आहे.
रंगभूमीवर काम करणाऱ्या नटांनी आपली नाट्यसंस्था स्थापन करण्याची मराठी रंगभूमीवर अनेकउदाहरणे आहेत. ती बरीचशी जुनी आहेत. प्रभाकर पणशीकरांनी ‘नाट्यसंपदा’ची स्थापना केल्यावर हा प्रयोग त्यानंतर फारसा झाला नाही. मच्छिंद्र कांबळी यांनी १९८० च्या दशकात ‘भद्रकाली’ची स्थापना करून तो पुन्हा सादर केला. (अलीकडे मात्र, प्रशांत दामलेच्या नावावर स्वतःची नाटय़संस्था आहे.)
मच्चिंद्र कांबळांच्या मृत्यूनंतर भद्रकालीची धुरा त्यांचे पुत्र प्रसाद कांबळी सांभाळत आहेत.
भद्रकाली प्रॉडक्शन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!