प्र.ल. मयेकर

या विषयावर तज्ञ बना.

प्रभाकर लक्ष्मण मयेकर (४ एप्रिल, इ.स. १९४६ - १८ ऑगस्ट, इ.स. २०१५:दादर, मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाटककार होते. मालवणी बोलीतील त्यांची नाटके प्रसिद्ध झाली.

मयेकर हे मुंबईत बी.ई.एस.टी. कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांनी नाट्यलेखन सुरू केले, ते निवृत्तीनंतर रत्‍नागिरीला स्थायिक झाल्यानंतरही सुरूच राहिले. सत्यकथेत त्यांच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या त्यांपैकी ’मसीहा’ ही कथा निवडून मयेकरांनी तिचे नाट्यरूपांतर केले व बेस्टच्या कलाविभागाने स्पर्धेत सादर केले. मयेकरांनी १९७० च्या सुमारास हौशी रंगूमीसाठी एकांकिका आणि नाटके लिहायला सुरुवात केली. दहा वर्षांनी त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होऊ लागली.

प्र.ल. मयेकर यांची मा अस साबरीन, अथ मनुस जगन हं, आद्यंत इतिहास असल्या कल्पनारम्य रूपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये प्रसिद्ध झाली. या नाटकांच्या रचना आणि त्यातील भाषेचा डौल हा त्यांचा स्वतःचा म्हणून ओळखला जातो.

वसंत कानेटकर यांची नाटके करणाऱ्या चंद्रलेखा या मोहन वाघ यांच्या संस्थेने त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आणायला सुरुवात केली. पुढे त्यांची मालवणी बोलीतील नाटके मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली संस्थेने रंगभूमीवर आणली.

कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती. मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांच्या नाटकांनी प्रेक्षक पुन्हा नाटके पहायला लागले.

प्र.ल. मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →