पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. याचे स्वरूप एक पदक आणि प्रशस्तीपत्र असे असून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो.
जानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्न पेक्षा कमी आणि पद्मभूषण पेक्षा जास्त असे समजले जाते. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. जुलै १३, १९७७ ते जानेवारी २६, १९८० पर्यंत हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.
पद्मविभूषण पुरस्कार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.