नीरजा (कवयित्री)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नीरजा (कवयित्री)

नीरजा (जन्म- २३ ऑक्टोबर १९६०) या एक मराठीतील कवयित्री व कथालेखिका व कांदबरीकार आहेत. त्या समीक्षक म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत.त्यांच्या आईचे नाव विभावरी पाटील आहे.

त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए. केले आहे. गेली पस्तीस वर्षं विविध कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन केल्यावर आता निवृत्त झालेल्या आहेत.

त्या 'ग्रंथालीच्या विश्वस्त होत्या'

'सानेगुरुजी ट्रस्ट'च्या अनुवाद सुविधा केंदाच्या त्या सध्या अध्यक्ष आहेत.



नीरजा यांनी ६०व्या मराठी साहित्य संमेलनात ‘व्यथा’ ही कविता वाचली होती. १९९१ मध्ये मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात सकाळी नवोदितांच्या कविसंमेलनात ‘सावित्री’ ही कविता म्हटली. ती गाजली. परीक्षक समितीत नारायण सुर्वे आणि प्र. श्री. नेरूरकर होते. त्यांनी संध्याकाळच्या निमंत्रितांच्या संमेलनात कविता वाचण्यासाठी पाच जणांची निवड केली. त्यात त्या होत्या. संध्याकाळी ‘आईस पत्र’ ह्या कवितेच्या मालिकेतील तीन कविता त्यांनी वाचल्या. त्या खूप गाजल्या. नीरजा यांचा पहिला कवितासंग्रह निरन्वय १९८७ ला आला व तेव्हापासून त्यांची एकूण १८ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →