ध्वनिसिद्धांत

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ध्वनिसिद्धांत हा आनंदवर्धन या भारतीय साहित्यशास्त्रज्ञाने इ.स.च्या ११ व्या शतकात त्याच्या ध्वन्यालोक या ग्रंथात हा सिद्धांत त्याने मांडला आहे. ध्वनिआत्मा काव्यस्य या अर्थातध्वनि हाच काव्याचा आत्मा आहे, असे त्याचे म्हणणे आहे. नाट्याचे अंतिम फलित रसनिष्पती होय असा भरतमुनीचा रससिद्धांत आनंदवर्धनाला मान्यच होता. मात्र काव्यात शब्दांच्या वाच्यार्थाला मुळीच महत्त्व नसल्याने त्या वेळी लक्षात आले होते. त्यामुळे

शब्दांची अमुखवृत्ती ( वाच्यार्थ नसलेली) हीच सर्व कविव्यापाराच्या मुळाशी आहे, (म्हणजे व्यंग्यार्थ) असे उद्भटांचे मत होते. ह्या व्यंग्यार्थ वृत्तीच्या विवेचनातूनच आनंदवर्धनाचा ध्वनिसिद्धांत निर्माण झाला आहे. अशाप्रकारे वाच्यार्थ आणि अलंकाराच्या पलीकडे जाऊन आनंदवर्धनाने आपला ध्वनिसिद्धांत सांगितलेला आहे. म्हणून त्याने अलंकार, रीती, रस, औचित्य या काव्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या संज्ञा नाकारल्या आहेत. वाच्यार्थाच्या पलीकडील व्यंग्यार्थ हाच ध्वनि असून आनंदवर्धानाने ध्वनि हाच श्रेष्ठ काव्याचा निकष मानला आहे. त्यामुळे तो श्रेष्ठ काव्याला ध्वनिकाव्य असे म्हणतो. त्याची ध्वनि ही काव्यातील अर्थाचा अर्थ अशा व्यंग्यार्थ संकल्पनेशी संबंधित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →