जीवन विद्या मिशन ही समाजाच्या उत्कर्षासाठी आणि उन्नतीसाठी झटणारी एक संस्था आहे. सद्गुरू वामनराव पै हे १९५५ सालापासून ह्या संस्थेच्या माध्यमातून जीवन विद्येचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
जीवन विद्येचे खालील दोन संकल्प आहेत,
हे जग सुखी व्हावे
हे हिंदुस्तान राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे.
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" ह्या सिद्धांताभोवती जीवनविद्येचे तत्त्वज्ञान फिरते. सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये जीवनविद्येचा प्रसार झाला. आजमितीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जीवनविद्येची केंद्रे सुरू झाली आहेत व लाखो लोकांनी जीवनविद्येचा स्विकार केलेला आहे. जीवनविद्या ज्ञान या जगातील प्रत्येकासाठी सुलभ आणि उपलब्ध होण्यासाठी. जीवनविद्येची जीवनमूल्ये आत्मसात करा जी चांगल्या मानवाला, मानसिकतेत परिवर्तन, सुसंवादी विचार, प्रेम आणि पर्यावरणाची काळजी याकडे नेत आहेत.
जीवन विद्या मिशन
या विषयातील रहस्ये उलगडा.