चंद्रकांत नागेशराव पाटील हे मराठी कवी, अनुवादक आणि समीक्षक आहेत. महाराष्ट्रातील १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमाद्वारे केलेले लेखन हे त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे योगदान आहे. मराठीप्रमाणेच ते हिंदी भाषेतील नामवंत कवी आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारती' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली देण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी २०१० सालापर्यंत सुमारे २६ मराठी पुस्तके आणि सुमारे ७ हिंदी पुस्तके लिहिली आहेत.
चंद्रकांत पाटील
यामागील विज्ञान आणि इतिहास.