गेवराई तालुका हा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील तालुका आहे. हा गोदावरी नदीच्या काठावर असून या तालुक्यात कापूस हे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
गेवराई शहर हे बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. गेवराईचे पूर्वीचे नाव गवराई असे होते.गेवराई पासून १२ किमी वर तलवडा आहे. गेवराई तालुक्यात राक्षसभुवन गोदावरीकाठी वसलेले गाव आहे.इ.स. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला. पाडळसिंगी हे गेवराई तालुक्यातील गाव आहे. या खेड्यातुन रा.म. २११ हा रस्ता जातो.
गेवराई तालुका
यामागील विज्ञान आणि इतिहास.