गुलाम नबी आझाद (रोमन लिपी: Ghulam Nabi Azad) (मार्च ७, १९४९ - हयात) हे राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. आझाद हे २००५ ते २००८ दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे ७ वे मुख्यमंत्री होते. तसेच ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते. फेब्रुवारी २०२१ पर्यंत त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये २७ ऑक्टोबर २००५ पर्यंत भारताचे संसदीय कार्य मंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांची जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २००२ च्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाचे यशस्वी नेतृत्व केले.
भारत सरकारने २०२२ मध्ये त्यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.ऑगस्ट 2022 मध्ये, आझाद यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर काही तासांनी जम्मू आणि काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोनिया गांधी यांनी आझाद यांचा राजीनामा स्वीकारला. २६ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी राहुल गांधींनी सल्लागार प्रक्रियेचा नाश केल्याचा उल्लेख केला आहे ४ सप्टेंबर २०२२ रोजी, आझाद यांनी काँग्रेस चा राजीनामा देऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमधील जनताच नाव ठरवेल, असे ते म्हणाले २६ सप्टेंबर २०२२ रोजी आझाद यांनी स्वतःचा राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक आझाद पार्टीची घोषणा केली. २७ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव बदलून डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी केले.
गुलाम नबी आझाद
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.