गुलशन कुमार मेहता उर्फ गुलशन बावरा (एप्रिल १२, इ.स. १९३७ - ऑगस्ट ७ , इ.स. २००९) हे प्रसिद्ध भारतीय गीतकार आणि हे हिंदी चित्रपट अभिनेते होते. पाकिस्तानात जन्म झालेले गुलशन यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात वास्तव्यास आले. आपल्या ४२ वर्षांच्या लेखन कारकिर्दीत त्यांनी एकूण २४० चित्रपट गीते लिहिली. त्यापैकी निम्म्याहून अधिक गीतांना आर.डी. बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांनी स्वरसाज चढविला. जंजीर या चित्रपटातील प्राण आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी आणि उपकार या चित्रपटातील मेरे देश की धरती.. ही त्यांची प्रसिद्ध गीते होत. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या हकीकत या चित्रपटासाठी त्यांनी शेवटचे गीत लिहिले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुलशन कुमार मेहता
या विषयावर तज्ञ बना.