वृत्त हे कवितारचनेची एक पद्धत आहे. आर्या आणि गीती ही दोन स्वतंत्र मात्रावृत्ते आहेत.
ओवी ज्ञानेशाची,
अभंगवाणी तुकयाची
सुश्लोक वामनाचा,
आर्या मयूरपंतांची ॥
या काव्यात म्हटल्याप्रमाणे आर्या ही मयूरपंताचीच (मोरोपंतांचीच) असे म्हणले असले तरी, मोरोपंतानी 'गीती' ह्या वृत्ताचा मराठीत फारच प्रसार केला. तिलाच आर्या म्हणण्याचा प्रघात पडला आहे; परंतु मुळात दोहोंत फरक आहे. खऱ्या आर्येत पहिल्या ते चौथ्या चरणामध्ये अनुक्रमे १२,१८ व १२,१५ अशा मात्रा असतात. तर ’गीती’मध्ये सम क्रमांकाचे चरण १८ मात्रांचे आणि विषम क्रमांकाचे चरण १२ मात्रांचे असतात."
गीती (वृत्त)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.