कायसंबल्ली चेंगलुराया रेड्डी (४ मे, १९०२:कायसंबल्ली, कोलार जिल्हा, कर्नाटक - २७ फेब्रुवारी, १९७६) हे म्हैसूर राज्याचे (आताचे कर्नाटक) पहिले मुख्यमंत्री होते. नंतर ते मध्य प्रदेशचे तिसरे राज्यपाल झाले.
रेड्डी यांचा जन्म वोक्कलिगा कुटुंबात झाला. ते लहानपणापासूनच बंडखोर होते. त्यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला होता.
कायद्याची पदवी घेतल्यानंतर, रेड्डी यांनी इतर राजकीय कार्यकर्त्यांसह १९३० मध्ये प्रजा पक्षची स्थापना केली. म्हैसूर संस्थानात जबाबदार सरकार स्थापन करणे हा या पक्षाचा उद्देश होता. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उचलून धरल्यामुळे पक्षाला ग्रामीण भागात पाठिंबा मिळाला. प्रजा पक्ष आणि प्रजा मित्र मंडळी यांनी १९३४ मध्ये प्रजा संयुक्त पक्ष (म्हैसूर पीपल्स फेडरेशन) ची स्थापना केली. १९३५ ते १९३६ दरम्यान रेड्डी याचे अध्यक्ष होते. यानंतर हा संघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाला आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाला. रेड्डी हे १९३७-३८ आणि १९४६-४७ असे दोनदा म्हैसूर काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते भारताच्या संविधान सभेचे सदस्यही होते.
के. चेंगलराया रेड्डी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.