कुसुमाग्रज प्रतिष्ठान

या विषयातील रहस्ये उलगडा.

कुसुमाग्रजांना गरजू व गरीब लोकांबद्दल खूप कळवळा होता. आदिवासी लोकांबद्दल जी माया होती, ती त्यांच्या कार्यातून दिसून येते. यातूनच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची योजना साकारली. ज्यासाठी त्यांनी १ लाख रुपये दिले. अनेक स्वंयसेवक उभे करून त्यांनी अनेक योजना उभ्या केल्या. त्यात प्रौढ शिक्षण, आरोग्यसुविधा, सांस्कृतिक व क्रीडा शिबिरे यांचा समावेश असे. प्रतिष्ठानचे नाशिकच्या आसपासची ७ खेडी घेऊन हे उपक्रम राबवले. या सर्व ठिकाणी कुसुमाग्रज वाचनालय उभे करण्यास साहाय्य दिले.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेले सामाजिक सांस्कृतिक प्रकल्प उभे करणे व अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, ह्या प्रेरणेांतून २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना नाशिक येथे झाली. तेव्हापासून कुसुमाग्रजांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रतिष्ठान कार्य करीत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →