आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक (पूर्वी आयसीसी विश्व ट्वेन्टी२० म्हणून ओळखली जात असे) ही ट्वेंटी२० क्रिकेटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्रिकेटची प्रशासकीय संस्था, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सध्या १६ संघांचा समावेश आहे, ज्यामध्ये दिलेल्या अंतिम मुदतीनुसार क्रमवारीतील अव्वल १० संघ आणि टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेद्वारे निवडलेल्या सहा संघांचा समावेश आहे.
सदर स्पर्धा साधारणतः दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. तथापि, स्पर्धेची २०२० आवृत्ती २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार होती, परंतु कोविड-१९ मुळे, स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आणि यजमानपद भारताकडे सोपविण्यात आले. २०१६ नंतर तब्बल पाच वर्षांनी २०२१ मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. तथापि, भारतातील कोविड-१९ महामारीमुळे, सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान येथे हलविण्यात आले. मे २०१६ मध्ये, आयसीसीने २०१८ मध्ये एक स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना पुढे आणली, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका संभाव्य यजमान असणार होता. परंतु २०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या समारोपाच्या वेळी, आयसीसीने २०१८ आवृत्तीची कल्पना वगळली.
२०२६ पर्यंत, दहा स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत, त्यात एकूण २४ संघांनी भाग घेतला आहे आणि आतापर्यंत सहा राष्ट्रीय संघांनी टी२० विश्वचषक जिंकला आहे. भारताने सर्वाधिक तीन विजय मिळवले आहेत (२००७, २०२४, २०२६). वेस्ट इंडिज (२०१२, २०१६) आणि इंग्लंड (२०१०, २०२२) यांनी दोनदा जिंकले आहेत आणि पाकिस्तान (२००९), श्रीलंका (२०१४) आणि ऑस्ट्रेलिया (२०२१) यांनी प्रत्येकी एक विजेतेपद पटकावले आहे. एकूण १५ देशांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे (वेस्ट इंडिजच्या ६ बेट राष्ट्रांसह). पटकावले होते.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.