अब्दुल हमीद

या विषयातील रहस्ये उलगडा.

अब्दुल हमीद

कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद इद्रिशी पीव्हीसी (१ जुलै, १९३३:धामुपूर, गाझीपूर जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - १० सप्टेंबर, १९६५:खेम करण, तरण तारण जिल्हा, पंजाब, भारत), हे एक भारतीय सैनिक होते. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान, परमवीर चक्र मरणोत्तर देण्यात आला.

हमीद डिसेंबर १९५४मध्ये सैन्यात दाखल झाले. त्यांची नियुक्ती ग्रेनेडियर्स रेजिमेंटच्या ४थ्या बटालियनमध्ये झाली. चीन-भारत युद्धादरम्यान, त्यांच्या बटालियनने चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी विरुद्ध नामका चूच्या लढाईत भाग घेतला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांच्या ४ ग्रेनेडियर्स बटालियनला खेम करण - भिखीविंड मार्गावरील चिमा गावाजवळील एक व्यूहात्मक जागेचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली गेली. ९-१० सप्टेंबर ला झालेल्या असल उत्तरच्या लढाईत हमीदने आठ पाकिस्तानी रणगाडे नष्ट केले आणि नवव्या रणगाड्याचा धुव्वा उडवत असताना त्यांना वीरमरण आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →