सम्राट कनिष्क (बॅक्ट्रियन भाषा: Κανηϸκι, कनेष्की; मध्ययुगीन चिनी भाषा: 迦腻色伽, कनिसक्का) हा मध्य आशिया आणि उत्तर भारताचा कुषाणवंशीय सम्राट होता. हा अंदाजे इ.स. १२७ ते इ.स. १५१ दरम्यान सत्तेवर होता. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सत्तेमध्ये येत राहिल्या त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुषण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमधील ज्यांनी राज्य स्थापन केले भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषण राज्यांनी केली नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशान शासकानी सुरू केली कुशान शासक कनिष्क याने साम्राज्याचा मोठा विस्तार केला कनिष्काचे साम्राज्य हे पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद ही काश्मीरमधल्या कुंडलवनात भरवण्यात आली कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले श्रीनगर जवळ असलेले कांपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले आहेत कनिष्काच्या दरबारात चरक प्रसिद्ध वैद्य होता.तो 'चरकसंहिते'चा दुसरा संपादक होता.कनिष्काने सोन्याचे नाणे प्रकरणांमध्ये आणले या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाहू नानू शाहू कनिष्क असा लेख आहे याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान असा आहे नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बुद्ध असे लिहिलेले आहे. त्याला दोन पत्नी होती ज्याचे नावामध्ये राणी सुप्रिया प्रमुख होती आणि दूसरी बायको विद्यामती होती. सुप्रियाकडून त्याला हुविष्क नावाचा मुलगा झाला आणि हुविष्काला
नंतर आपली पत्नी भाग्यश्रीकडून वासुदेव प्रथम झाला.
सम्राट कनिष्क
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.