संस्कृत भाषेत लेखन आणि काव्यरचना करणारे अनेक कवी होऊन गेले असले तरी त्यांपैकी ललितकाव्ये लिहिणाऱ्या चार कवींचा उल्लेख पुढील श्लोकात होतो. या श्लोकात प्रत्येक कवीचे वैशिष्ट्य सांगितले आहे. कालिदासाची उपमा, भारवी कवीची अर्थपूर्ण शब्दरचना, दंडी कवीचे पदलालित्य आणि माघ कवीमध्ये हे तीनही गुण आहेत.
उपमा कालिदासस्य । भारवेः अर्थगौरवम् ।
दंडिनः पदलालित्यम् । माघे सन्ति त्रयो गुणाः ॥
संस्कृत महाकवी
थोडक्यात पण महत्त्वाचे.